breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

देशात मध्यावधी निवडणुका होणार? प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यापुर्वी राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात येत्या पाच महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत. ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील, असा दावा त्यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा – पुणेकरांनो सावधान! दुपारी ११ ते ३ वाजेदरम्यान बाहेर जाणे टाळा!

येणाऱ्या ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यासाठीच भाजपने २ हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत. निवडून येण्यासाठीचं भाजपचजं हे चोकिंग राजकारण आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षांनी गाफिल राहू नये. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महानगर पालिकेच्या निवडणुकीत आम्ही वेगळं होऊ शकतो. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच बिघाडी होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीतील असलेली अस्थिर परिस्थिती ऑगस्टपर्यंत स्थिर होण्याची शक्यता दिसत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button