breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होण्याची शक्यता; महापालिकेची मंजुरी

Ahmednagar | औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्याच्या निर्णयानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा महापालिकेचा ठराव देखील घेण्यात आला आहे. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवला जाणार आहे.

महानगरपालिकेचा ठराव काय?

  • जिल्हाधिकाऱ्यांकडून नामांतराचा ठराव पाठविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना आले.

हेही वाचा       –      ‘टीएमसीचा अर्थ तू, मी आणि करप्शन’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

  • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तातडीने अधिकाऱ्यांची महासभा घेतली.
  • सध्या महानगरपालिकेत प्रशासक असून, अतिरिक्त्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांच्या उपस्थित महासभा झाली.
  • महासभेत अहमदनगरचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे नामांतर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
  • हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर राज्य व केंद्र याबाबत निर्णय घेतील.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button