मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तर पुढं काय? उल्हास बापटांनी सांगितला नियम
![What next if Chief Minister Eknath Shinde is disqualified?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Eknath-Shinde-and-Ulhas-Bapat-780x470.jpg)
मुंबई | मागील काही दिवसांपासून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. परंतु या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाचा निकाल येईल असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. त्यावर ज्येष्ठ घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे.
डॉ. उल्हास बापट म्हणाले, आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे आणि यात जेव्हा पंतप्रधान शक्तिशाली होतात तेव्हा या लोकशाही चे रूपांतर प्राईम मिनिस्ट्रियल सिस्टीममध्ये होतं.
शक्तिशाली पंतप्रधान असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग काय आणि सुप्रीम कोर्ट काय यांच्या संदर्भात असलेली विश्वासार्हता कमी होत चालली आहे. त्यामुळे अँटी डिफेक्शन कायदा मजबूत करण्याची गरज असल्याचे मत बापट यांनी व्यक्त केले. तसेच आमदार पात्रेवर देखील बापट म्हणाले.
हेही वाचा – पॅन कार्डवर नाव चुकलंय? नाव दुरूस्त करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा
आमदार अपात्र झाले तर पुढं काय?
हा निर्णय जर कोणाच्याही विरोधात गेला तरी सुप्रीम कोर्टात जाता येणार आहे. पण कोर्ट सुद्धा लवकर निर्णय देणार नाही त्याला दोन महिने तरी लागतील आणि तेवढ्या वेळात निवडणुका येतील. त्यामुळे आता जनताच ठरवेल शिंदे बरोबर होते की उद्धव ठाकरे. जर आमदार अपात्र झाले तर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. जर हे सरकार पडलं तर हा प्रश्न राज्यपाल यांच्याकडे जाईल की दुसरा कुणी व्यक्ती आहे का ज्याच्याकडे बहुमत आहे. कुणालाच जर बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे उल्हास बापट म्हणाले.