शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! एप्रिलपर्यंत ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा
![Shinde government, masterstroke, 30 thousand by April, recruitment of teachers,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Mahila-Bahuddeshiy-Sanshtha-1-780x470.png)
मुंबई: महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) द्वारे शिक्षकांच्या 30,000 रिक्त जागा भरल्या जात आहेत आणि एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. वर्षातून दोनदा टीएआयटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसवर भरतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या कंपन्या केंद्र सरकारसाठीही काम करतात आणि विश्वासार्ह आहेत, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, भरती प्रक्रिया एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, पुढील शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षक अध्यापनासाठी उपलब्ध होतील.
सध्या महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी संपावर आहेत. या संपात शिक्षक संघटनाही सहभागी आहे. मात्र, आता काही शिक्षक संघटना या संपातून बाहेर पडताना दिसत आहेत. काही संस्था आजपासून कामावर परतल्या आहेत. त्यामुळे शिक्षक संघटनांमध्येही फूट पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने विधानसभेत 30 हजार शिक्षक भरतीची घोषणा केली आहे.
सरकारच्या या पावलाकडे मास्टर स्ट्रोक म्हणूनही पाहिले जात आहे. शिंदे सरकारच्या या पावलामुळे बहुतांश शिक्षक संघटना आपला संप मागे घेऊ शकतात, असे मानले जात आहे. मात्र, जुन्या पेन्शन योजनेबाबत त्यांचा संप सुरू आहे. ज्याला महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचाही पाठिंबा आहे.