Pahalgam Terror Attack | ‘पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला’; शरद पवार यांचं वक्तव्य

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज ठाण्यातील प्रति तुळजापूर मंदिरात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने देवीची पूजा करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या या मंदिरात शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी पूजा-अर्चा केली. यावेळी शरद पवार यांना पत्रकारांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारले, त्यावर त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? हे विचारलं असता शरद पवार म्हणाले की दोन कुटुंबं एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज राजकारणावर काही भाष्य नको असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Gold Rate | सोन्याचे दर २७००० रुपयांनी घसरणार; बड्या कंपनीचा मोठा दावा!
पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात धर्म, जात, पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे यासंबंधी जी उपाय योजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हीच भूमिका आमची आहे. पहलगाम प्रश्न विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच आहे. कारण पहलगाम प्रश्नी संपूर्ण देश एक आहे. कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे दाखवण्यासाठी विशेष अधिवेशन घेणं हे उपयुक्त ठरेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.