‘बॅनरबाजी अन् पार्टी देऊन निवडणूक जिंकता येत नाही’; नितीन गडकरींचं विधान
![Nitin Gadkari said that election cannot be won by throwing banners and parties](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Nitin-Gadkari-4-780x470.jpg)
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत असतात. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षम परिषदेच्यावतीने दहावी आणि बारावीतील गुणवत्ता विद्यार्थ्याच्या सत्कार कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या काळात कुठलीही अमिष दाखविण्यापेक्षा माणसांच्या मनात विश्वास आणि प्रेम निर्माण करा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
नितीन गडकरी म्हणाले की, माणसांच्या गुणवत्तेचा संबंध त्यांच्या जाती किंवा कुठल्याही पंथाशी नाही तर त्याच्या गुणवत्तेशी असतो. त्यामुळे निवडणूक आली की हा माझ्या धर्माचा किंवा जातीचा असा विचार करण्यापेक्षा लोकांचे प्रेम आणि विश्वास निर्माण केले पाहिजे. कुठल्याही समाजाचा नेता हा त्या समाजाचा संपूर्ण विकास करत नाही.
हेही वाचा – ‘राज साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद पडले, आता माझ्यामुळे..’; टोल प्रकरणावर अमित ठाकरेंचं विधान
निवडणुकीच्या काळात मोठे प्रचारासाठी मोठे फलक लावत असतो मात्र प्रचाराचे फलक लावत किंवा सावजी मटनच्या पाटर्या देऊन कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. आता लोक शहाणे झाले आहे. पार्टी करुन घेतात आणि मत दुसऱ्यांना देतात. त्यामुळे लोकांचा विश्वास व प्रेम निर्माण करा. आम्ही सर्व एक परिवार असून सर्व मिळून समाजाचे हित कशात आहे यावर काम करण्याची गरज आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.