Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“माझ्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे”; मनोज जरांगे पाटीलांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोठे आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या कटामागे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे असल्याचा थेट आरोप जरांगे यांनी केला. त्यांनी ही माहिती स्वतः पोलीस प्रशासनाला दिली असल्याचेही सांगितले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करावी. कारण आरोपींसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी खून करण्याचा आणि घातपात करण्याचा कट रचला आहे. बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नेत्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानाने ऐकली आहे. त्यामुळे तुम्ही पक्षातील लोकांना विचारून घ्या की जरांगे पाटील सांगत होते ते खरे आहे का? मला ही गोष्ट कळाली. त्यानंतर याबाबतची माहिती मी पोलीस प्रशासनाला दिली. कारण मुख्य सूत्रधारच धनंजय मुंडे आहेत. ज्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सरकारने संरक्षण देणे गरजेचे आहे.

हेही वाचा     :          सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची एन्ट्री बंद! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश 

मराठा समाजाने शांत रहावे. माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांनीच माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button