ताज्या घडामोडीराजकारण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प केला सादर 

कररचनेच्या घोषणेनंतर सर्वसामान्य आणि नोकरदारवर्गाला दिलासा

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर मोदी सरकार करदात्यांना पावले असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ज्यांचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे, आशा व्यक्तींना करमुक्त करण्यात आलं आहे.

हेही वाचा – 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धाउत्तराखंड 2024-25 खो-खोत महाराष्ट्रचा दुहेरी धमाका!

त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या या कररचनेच्या घोषणेनंतर सर्वसामान्य आणि नोकरदारवर्गाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्याने सरकारला एक लाख कोटींचा तोटा होणार आहे. नव्या कररचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0 टक्के कर, 4 लाख ते 8 लाखा वर 5 टक्के, 8 लाख ते 12 लाखा वर 10 टक्के, 12 लाख ते 16 लाखा वर 15 टक्के, 16 लाख ते 20 लाखा वर 20 टक्के आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25 टक्के कर आकारण्यात येईल. तर 24 लाखाच्या पुढे 30 टक्के कर आकारण्यात येणार आहे. पूर्वी तुमचं उत्पन्न 10 लाख असेल तर तुम्हाला 50 हजार कर भरावा लागत होता. तर आता तुम्हाला कोणताही कर द्यावा लागणार नाही त्यामुळे तुमचा 50 हजारांचा फायदा होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button