breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा नाही, कारण..’; बच्चू कडू यांचं सूचक विधान

मुंबई : अजित पवार यांनी काही आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला आहे. तेव्हापासून बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूचक विधान केलं आहे.

बच्चू कडू म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारादिवशी मी अमेरिकेत किंवा परदेशात असेल, असं सांगितलं आहे. आता जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आचारसंहिता लागू शकते. नंतर लोकसभा आणि मग विधानसभेची आचारसंहिता लागते. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा होणार नाही.

हेही वाचा – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ‘तोषखाना’ प्रकरणी अटक

उद्धव ठाकरे यांना गद्दार किंवा खोके म्हणण्याचा अधिकार नाही. कारण, फार कष्टातून आणि मेहनतीतून उद्धव ठाकरे पक्ष चालवत आहेत, असं नाही. बिगर खोक्यांचा त्यांचा पक्ष चालल नसेल. ३० वर्षे मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती. महापालिकेत काहीच केलं नाही, हे शक्यच नाही. आदित्य ठाकरे हे नेहमी खोके सरकार बोलत असतात. पाहिले स्वत:ला तपासून घेत आरोप केले पाहिजेत, असंही बच्चू कडू म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button