‘भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो, नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो’; बच्चू कडू यांची टीका
![bacchu kadu said that BJP takes it as a friendly party, then hugs it like Afzal Khan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Bacchu-Kadu-1-780x470.jpg)
मुंबई : प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे चांगलं नाही, असं बच्चू कडू म्हणाले. ते हिंगोलीत बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, भाजपाकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम केलं जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडे यांना लक्ष घालण्यास सांगितलं. पण, बोलून कुणी लक्ष घालत नाही. एकीकडं सांगायचं सरकारमध्ये सामील व्हा. सामील झाल्यानंतर अशा प्रकारची भूमिका घ्यायची. हे कुणासाठीही चांगलं नाही.
हेही वाचा – महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी महत्वाच्या आहेत ‘या’ योजना
ज्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल. बावनकुळे स्पष्ट बोलले, ‘काहीही करून कसं पाडायचं, कोणत्या पद्धतीनं जायचं.’ मला वाटतं, भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो. हे चांगलं नाही, असं बच्चू कडू म्हणाले.