भाजपा प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण; म्हणाले..
Ashok Chavan | ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. चव्हाण भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. दरम्यान, ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे. दुपारी बारा-साडेबारा वाजता पक्षप्रवेश होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अन्य जिल्ह्यांतील संभाव्य प्रवेश होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरूंगापेक्षा भाजप बरा’; संजय राऊतांचा खोचक टोला
#WATCH | After quitting Congress, former Maharashtra CM Ashok Chavan says "Today around 12-12:30, I am going to start a new journey of my political career, I am going to join BJP…" pic.twitter.com/hpSZDoQVWp
— ANI (@ANI) February 13, 2024
अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले, तो विषय आता संपला आहे. यासंदर्भात मी आता तुमच्याशी दुपारी बोलेन.
जिल्ह्यातील, मतदारसंघातील बरेच लोक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. नवीन सुरुवात करायची आहे. जिल्ह्यातील समीकरणे आहेत, हे सगळं लक्षात घेऊन पुढील वाटचाल चांगली व्हावी असा प्रयत्न आहे आमचा. जिथे मी राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपात असतानाही प्रामाणिकपणे काम करेन. माझ्या कामातूनच मी उत्तर देईन, असंही अशोक चव्हाण म्हणाले.