‘Operation Sindooor’हा पहलगाम हल्ल्याचा बदला; गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया

Operation Sindooor | भारताने पाकिस्तानला उत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार हल्ले केले आहेत. भारताने पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले आणि अनेक दहशतवाद्यांच्या खात्मा केला आहे. या मोहिमेला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय. दरम्यान, या प्रत्युत्तरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स पोस्टवर म्हटलंय की, आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी आहे.
हेही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन; उपमुख्यमंत्री अजित पवार
भारताने एअर स्ट्राईक केलेली पाकिस्तानमधील ९ ठिकाणं
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद
या नऊ ठिकाणी भारतीय सैन्यदलाने बुधवारी मध्यरात्री एअर स्ट्राईक केला.
पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. आज देशात काही ठिकाणी मॉक ड्रील होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं, त्याआधीच भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे.