‘विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल’; अजित पवारांची शिरूरकरांना ग्वाही
![Ajit Pawar said that the backlog of development works will be filled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Ajit-Pawar-780x470.jpg)
पुणे | संपुर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत त्यांच्याशी संवाद साधून कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याप्रमाणे त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आळंदी येथील फुटवाले धर्मशाळेच्या भव्य सभागृहात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
तीर्थक्षेत्र देहू आळंदीच्या विकासाबरोबर पालखी महामार्गाची विकासकामे मार्गी लावली. आता येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी दिले. तसेच ही देशाची निवडणूक असल्याचे आढळराव पाटील यांना निवडून द्या, येथील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
हेही वाचा – रवींद्र धंगेकरांच्या प्रचारपत्रकावर घड्याळ, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
आढळराव पाटील पुढे म्हणाले की, आपण कोणत्याही प्रकारच्या शूटिंगला जाणार नाही. त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी तसेच मतदार संघातील उर्वरित विकास कामासाठी देणार आहे. आळंदी येथील देवस्थानच्या जागेत विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लागेल. पुणे मेट्रो आळंदी पर्यंत आणण्यास प्रयत्न करायचे आहेत. मी मतदारसंघासाठी पुर्ण वेळ काम करणारा माणूस आहे. यामुळे निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं.