breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ म्हणत तरूणाची आत्महत्या!

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे मराठा आरक्षणासाठी तरूणाने आत्महत्या केली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडज येथील एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. किसन माने याने मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केल्याचा दावा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Kesari : यंदा धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा!

‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे म्हणत तरुणाची तलावात उडी टाकून आत्महत्या, असं एक्स ( ट्वीटर ) अकाउंटवर राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.

प्रत्यक्षदर्शनी व्यंकट गाडे यांनी सांगितले की, किसन हा नेहमी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करायचा. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास त्याने कपडे काढत मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणत तलावात उडी घेतली. तेव्हा मी तलावात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो गाळात अडकल्याने आम्ही वाचवू शकलो नाही. यानंतर तहसीलदार, पोलिस निरीक्षक आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button