रामलीला मैदानावर काँग्रेसची ‘भारत बचाव रॅली’; मोदी सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/rahul-gandhi-morcha-Frame-copy.jpg)
महाईन्यूज | दिल्ली
नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर काँग्रेसने आता मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीत आज रामलीला मैदानावर काँग्रेसकडून ‘भारत बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारावीत अशी विनंती काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून कळते आहे.
काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही मोठी रॅली आहे. या रॅलीपूर्वी ज्याप्रकारे भाजपाने संसदेत राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केलो होता. त्यामुळे आज या रॅलीद्वारे काँग्रेस नेत्यांबरोबरच राहुल गांधी यांचाही आक्रमक पवित्रा पहायला मिळू शकेल. काँग्रेस या रॅलीमध्ये आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरणार आहे. नागरिकत्व कायद्यावरुन ईशान्य भारतात उसळलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्याबरोबरच पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हा कायदा लागू न करण्याचा तिथल्या राज्य सरकारांनी घेतलेला आहे. हे मुद्देही यावेळी काँग्रेसच्या अजेंड्यावर असणार आहेत.