breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

पोलिसांसमोर आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हणण्यास सुरवात केली,आणि काय झाल ? पहा…

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळणही घेतलं आहे. अशा वातावरणात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर एक अनोखा प्रकार पहायला मिळाला.

जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पोहोचले होते. मात्र पोलिसांना पाहताच आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हणण्यास सुरूवात केली. जन गण मन ऐकताच पोलिसांनी कोणत्याही आंदोलकाला हात लावला नाही. तसंच पोलिसांनीही त्यांच्यासोबत राष्ट्रगीत म्हणण्यास सुरूवात केली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे.

तर दुसरीकडे बंगळुरूमध्येही असाच प्रकार घडला. आंदोलकांना हटवण्यासाठी गेलेल्यापोलिसांसमोर आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हणण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त चेतन सिंग राठोड यांनीदेखील जमावासोबत राष्ट्रगीत म्हटल्याचं पहायला मिळालं.

आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं दिल्लीतील काही भागांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यी जमावबंदीचा आदेश झुगारून जंतर मंतरवर दाखल झाले होते. यावेळी अनेकांनी सेव्ह कॉन्स्टिट्युशनचे बॅनर्स होती घेऊन आंदोलन केलं. तर लाल किल्ला परिसरातही अनेक आंदोलक विद्यार्थी जमा झाले होते. परंतु त्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. त्यानंतर २० गाड्या भरून विद्यार्थ्यी ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर घोषणाबाजीही केली. दिल्ली पोलीस आमच्यासोबत चर्चा करा, आमच्यासोबत चर्चेसाठी या, आम्ही युवा आहोत, आम्ही चर्चा करू अशी घोषणाबाजी युवकांकडून करण्यात आली.. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात जे काही पडसाद उमटलेत ते पाहून सरकारनं काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज भासू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button