Gayathri School : मुलांना नोकरी मिळणारे नव्हे, नोकरी देणारे बनवा!
गायत्री ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक विनायक भोंगाळे यांचे मत : ‘पालक मार्गदर्शन’ उपक्रम उत्साहात, पालकांनी व्यक्त केले समाधान
पिंपरी : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी प्रेम आणि काळजीने पालनपोषण करण्याच्या विविध मार्गांचा पालकांनी अभ्यास केला पाहिजे. मुलांना केवळ नोकरी करणारे नाही, तर नोकरी देणारे बनवले पाहिजे, असा संदेश गायत्री ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी दिला.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, गायत्री ग्रुप ऑफ स्कूलनेच्या वतीने ‘‘पालक मार्गदर्शन अभिमूखता’’ कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये श्री. भोंगाळे बोलत होते.
यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे कडू पाटील आणि विश्वस्त सरिता विखे पाटील, सचिव संजय भोंगाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी केलेल्या गणेश वंदना व राम शिंदे यांनी सादर केलेल्या विठुरायाच्या मधुर भजनाने झाली. मोशी व चऱ्होली शाखेच्या इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांचे पालक, शिक्षक व पालक प्रतिनिधी यांच्यासमवेत करण्यात आला.
अंजली भागवत यांनी पालक आणि शिक्षक यांच्यातील प्रभावी संवादाच्या फायद्यांविषयी विस्तृतपणे सांगितले. त्यांनी शाळेच्या संरक्षकांशी मजबूत संबंधावर भर दिला. शाळेतील मुलांना उत्तम शिक्षण आणि वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पालकांकडून सहाय्य आणि सूचना मागितल्या आणि चांगल्या पालकत्वासाठी काही मार्गदर्शक तत्वे सांगितली.
या अभिमूखता कार्यक्रमामध्ये “प्लास्टिकमुक्त भारत अभियान” हा नवीन उपक्रम मांडला. सर्व विद्यार्थी व पालकांच्या मदतीने तो पूर्ण करण्याचा निश्चय गायत्री इंग्लिश मेडियम स्कूलच्या शिक्षकांनी केला.
कार्यक्रमाचे नियोजन ऑपरेशन हेड रूपाली बोबडे, मोशी व चऱ्होली शाखेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता शिंदे व ज्योती दरेकर तसेच उपमुख्याध्यापिका रूपाली अभंग, प्रिया नेवाळे, सहकारी रोहिणी पाटील, श्रुती जोशी व सर्व शिक्षकवृंद यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी खास पालकांना समर्पित केलेल्या गाण्याद्वारे व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
पालकांना विविध विषयांचे मार्गदर्शन…
पालकांना शाळेच्या नियमांची माहिती देण्यात आली. नंतर संबंधित शिक्षकांनी विविध विषय आणि पुढील वर्षात कोणते उपक्रम राबवले जातील याची माहिती दिली. सह-शालेय उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली. पालकांना स्वतः निर्देशित केलेल्या अभ्यासक्रमाची कल्पना दिली. विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकात पुढे जाण्यासाठी सर्जनशील प्रतिभा, नेतृत्व, संवाद कौशल्य, व्यवसायाभिमूख कल, मुलाखत कौशल्य अशी इतर अनेक कौशल्ये विकसित करून कॉर्पोरेट, सामाजिक व इतर अनेक क्षेत्रात यशस्वी होऊन एक उत्तम नागरिक घडवण्याबद्दल श्जीवकुमार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
‘‘पालक मार्गदर्शन अभिमूखता’’ कार्यक्रम शाळेचा अभ्यासक्रम, नियम, अध्यापन पद्धती आणि सह-शैक्षणिक क्रियाकलापांसह “प्रगतीशील भागीदार म्हणून” त्यांना परिचित करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला होता.”पालक हा घरी शिक्षक असतो आणि शिक्षक हा शाळेत पालक असतो आणि मूल हे आपल्या विश्वाचे केंद्र असते.”
– कविता भोंगाळे कडू-पाटील, व्यवस्थापकीय संचालक, गायत्री ग्रुप ऑफ स्कूल.