राज्यभरात एसटी कर्मचा-यांचा संप ; प्रवाशांचे हाल
पिंपरी – एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे राज्यभरातील विविध आगारात बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवासाचे संप व पावसामुळे हाल होत आहेत. बसस्थानकावर प्रवासाची गर्दी असून या संपात शिवसेनेच्या वाहतूक सेना मात्र या संपातील सहभागी झाली नाही. यामध्ये एसटीच्या अनेक फे-या रद्द झाल्या असून काही मोजक्याच फेऱ्या होवू लागल्या आहेत. त्यामुळे खासगी वाहनधारकाकडे प्रवासी मागेल त्या दरात पैसे देत प्रवास करीत आहे.
महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटना (संलग्न आयटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) इ. संघटनांतर्फे हा संप पुकारला गेला असून त्यांनी मध्यरात्री बारापासून संपाला सुरवात केली. या संपात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक उत्सफूर्तपणे सहभागी होतील.
राज्यातील सांगली, भंडारा, औरंगाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, लातूर, नगर, नागपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे मध्यरात्रीपासूनच कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे या स्थानकात एसटी केवळ जागेवर उभ्या आहेत व यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. ठाण्यातील खोपट आणि वंदना येथील आगरातून काल पासून केवळ 20 गाड्या रवाना झाले आहेत रोज ठाण्यातील खोपट आणि वंदना आगार येथून 200 हुन अधिक गाड्या रवाना होतात, आज संप असल्यामुळे ठाण्यातील दोन्ही आगारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अचानक केलेल्या संपामुळे प्रवाशांची मात्र हाल होत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांची पगार वाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. सरकारने याबाबत तोडगा न काढल्याने दोन वेळा एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी संप केला होता. प्रत्यक्षात चार हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळाल्याचे कारण देत पुन्हा संपाचे हत्यार उपसले. या संपामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राज्य भरातील अनेक आगाराच्या प्रवेशद्वारासमोर एसटीच्या विविध संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. शिवसेनेचे वाहतूक सेनेचे कर्मचारी मात्र संपावर गेले नसल्याने एसटी सेवा अंशतः सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या संपामुळे आणि पाऊस यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.