breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मोदी का एक ही नारा, न घर बसा तेरा, न बसने देगा हमारा’ – छगन भुजबळ

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मोठ्या थाटात मोदींनी स्मार्ट सिटीचा गाजावाजा केला. आज राज्यात चार शहरं देखील स्मार्ट झालेली नाहीत. मोदी तर सर्वच योजनांमध्ये फेल ठरले आहे. चहा फेल, मेक इन इंडिया फेल, जीएसटी फेल, नोट बंदी फेल आता राफेल, अशी मालिका भाजपची सुरू आहे. योगी मोदी का एक ही नारा, न घर बसा तेरा, न बसने देगा हमारा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर सभेत शरसंधान साधले.

निर्धार परिवर्तनाची मोहीम राष्ट्रवादीच्या वतीने सुरू केली आहे. त्यानिमित्त सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर जाहीर सभेत भुजबळ बोलत होते. यावेळी नेते अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह शहरातील आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

‘आम आदमी के साथ मन की बात, अदानी के साथ धन की बात’. ‘वारं शासन तेरा खेल, मांगा न्याय, हो गई झेल’. अशा काव्य पंक्तींची लकीर ओढत भुजबळ म्हणाले की, आडीच वर्ष मला झेलमध्ये ठेवलं. मलाही कळलं नाही, का पकडलं ते. ज्यांनी पकडलं त्यांनाही कळलं नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदन 150 खोल्यांचे बांधले. वातानुकुलीत खोल्या आहेत. अमित शहा आजही त्याठिकाणीच पक्षाच्या बैठका घेतात. मोदींनी एक तास महाराष्ट्र सदन फिरून बघितलं आहे. 100 कोटीचं हे काम आहे. काम करणा-या कंत्राटदारांला अद्याप एक रुपया देखील दिलेला नाही. वरून माझ्यावर 25 कोटी रुपये खाल्याचा आरोप केला. शंभर कोटीमध्ये साडेआठशे कोटी कसे खाणार. आरोप करून घरदार सगळं जप्त केलं आहे.

एवढे होऊन पुन्हा तोंड बंद करण्याची धमकी दिली. माझं तोंड बंद कदापी होणार नाही. ‘उडणे दो मिट्टी को हमपर, हवाने साथ छोड दिया तो मिठ्ठी जमिनपर आयेगी’, असे म्हणत भुजबळ पुढे म्हणाले, पाच राज्यांत नुकताच भाजपच्या पराभवाचा प्रत्यय आला आहे. मोदी तर सर्वातंच फेल ठरले आहेत. त्यांचा चहा फेल, मेक इन इंडिया फेल, स्मार्ट सिटी फेल, जीएसटी फेल, नोट बंदी फेल आता राफेल, अशी त्यांची मालिका सुरू आहे. काँग्रेसने साडेपाचशे कोटींना एक विमान घेण्याचा ठराव केला होता. यांनी त्याची किंमत वाढवून भ्रष्टाचार केला. नाशिक येथील वैमानिकाला त्याचे काम दिले होते. मोदींनी ते काम काढून अंबानी यांना दिले, असेही ते म्हणाले.

हा लॉली पॉल ओबीसींना दाखवू नका

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे सरकारने अद्याप भरलेले नाहीत. मराठा कुणबी मारामारी लावायची, हिंदू-मुसलमान मारामारी लावायची, हाच एक कलमी कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे. चार वर्षात राममंदीरचा विषय आला नाही. निवडणुका आल्यामुळे आता राम मंदिराचा टाहो फोडला जात आहे. यांना राम मंदिर बनवायचं नाही. यांना सरकार बनवायचं आहे. हनुमानाची जात काढली. जैसा रहमान, सुलेमान, सलमान तैसा हनुमान, असे म्हणत हे भाजप सरकार लोकांना दारिद्र्यात बुडविण्याचं काम करत आहे, अशी टिका भुजबळ यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button