पिंपरी चिंचवड शहरात पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता धुसर
पाणी पुरवठा विभागाचा दोन महिन्यांचा कालावधी लोटला, सुधारणाबाबत आयुक्त आढावा घेणार
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी-चिंचवड शहरात दोन महिन्यापुर्वी समान पाणी पुरवठा वितरण, अनधिकृत नळ कनेक्शन तोडणे, जलशुध्दीकरणाची क्षमता वाढवण्यासह विविध कामकाज अद्याप पुर्ण झालेले नाही. त्यामुळे शहराचा दिवसाआड पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
समान पाणी वितरण धोरण राबविण्यासाठी महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी २५ नोव्हेंबर 2019 पासून सुरू केली. दोन महिन्यांनी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार शनिवारी (ता. २५) दिवसाआडच्या अंमलबजावणीस दोन महिने पूर्ण होत आहेत.
सध्यस्थितीत नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. पुरेसे पाणी पुरवठा आहे. दिवसाआडमुळे पाण्याचा साठा करून ठेवला जातोय, या नागरिकांच्या प्रतिक्रिया पाण्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत, असा दावा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करु लागले आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी घेतलेला दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आता कायम राहण्याची शक्यता आहे. तर आयुक्त श्रावण हर्डिकर हे आढावा बैठकीत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.