खाद्यतेल उत्पादनात भारत होणार ‘आत्मनिर्भर’, कृषी मंत्रालयाची माहिती
११ राज्यांतील ४९ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली पाम तेल लागवडीची मोहीम
Palm Plantation : राष्ट्रीय खाद्यतेल मिशन–ऑइल पाम अंतर्गत ११ राज्यांतील ४९ जिल्ह्यांमध्ये पाम तेल लागवडीची (palm plantation) मोहिम राबवण्यात आली. पाम तेल प्रक्रिया कंपन्यांसह राज्य सरकारांनी पाम तेल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी ‘मेगा ऑइल पाम प्लांटेशन ड्राइव्ह’ सुरु केले आहे. यामुळं खाद्यतेल उत्पादनात भारत ‘आत्मानिर्भर’ होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ७ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सुमारे ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ५ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात २५ जुलै २०२३ रोजी झाली होती. १२ ऑगस्टला या मोहिमेचा समारोप करण्यात आला. २०२५-२६ पर्यंत ६.५ लाख हेक्टर क्षेत्रावर पाम तेल लागवड करण्याचे उद्दीष्ट आहे.
हेही वाचा – माजी आमदार रमेश कदम ८ वर्षांनंतर तुरूंगा बाहेर, २ वेळा तुरूंगातून लढवलेली निवडणूक
११ राज्यांमधील ४९ जिल्ह्यांतील ७७ गावांमधील ७ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी पाच लाखाहून अधिक पाम तेलाच्या वृक्षाची लागवड केली आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, मिझोराम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा या प्रमुख पाम तेल उत्पादक राज्यांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.