breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चिपळूणमध्ये दरड कोसळून घर जमीनदोस्त, दोन वर्षाच्या मुलासाठी एनडीआरएफचं सर्च ऑपरेशन
रत्नागिरी |
रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे. रत्नागिरीत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून १७ जण बेपत्ता आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे कुंभारवाडीचाही समावेश आहे. पेढे कुंभारवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत घर जमीनदोस्त झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
एनडीआऱएफच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा हायवेलगत असणाऱ्या घऱावर जवफपास १०० फुटांवरुन दरड कोसळली. या दुर्घटनेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. दोन मृतदेह हाती लागले आहेत. मात्र दोन वर्षाच्या आरूषचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. आरुषचा मृतदेह मातील गाढला गेला असून तो शोधण्यासाठी एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.