विराट कोहलीसोबतच्या वादावर नवीन उल हकचा मोठा खुलासा; म्हणाला..
Virat Kohli vs Naveen Ul Haq : आयपीएलमध्ये २०२३ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात मोठा वाद झाला होता. यानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही या वादात उडी घेतली होती. यानंतर हा वाद चांगलाच चर्चेत आला होता. दरम्यान, याबाबत नवीन उल हक याने मोठा खुलासा केला आहे.
नवीन म्हणाला की, त्याने वाद सुरू केला नसून सामना संपल्यानंतर कोहलीनेच भाडण सुरू केले. त्याने हे सर्व सामनादरम्यान आणि नंतर बोलायला नको होते. मी वाद सुरू केला नाही. सामना संपल्यानंतर जेव्हा आम्ही हस्तांदोलन करत होतो, तेव्हा विराट कोहलीने भांडण सुरू केले. पेनल्टी पाहिल्यावर तुम्हाला समजेल की वाद कोणी सुरू केला.
हेही वाचा – कर्नाटकात काँग्रेसकडून धर्मांतरविरोधी कायदा रद्द, सावरकरांचा धडाही वगळला
मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की, मी सहसा कोणालाही स्लेजिंग करत नाही आणि जरी मी करत असलो तरी मी गोलंदाजी करत असताना फलंदाजांना करतो. कारण मी गोलंदाज आहे. त्या सामन्यात मी काहीच बोललो नाही. एक शब्दही नाही. मी फलंदाजी करताना किंवा सामन्यानंतर कधीच माझा संयम गमावला नाही. सामन्यानंतर मी काय केले ते प्रत्येकजण पाहू शकतो. मी फक्त हस्तांदोलन करत होतो आणि नंतर कोहलीने माझा हात घट्ट पकडला आणि मी देखील एक माणूस आहे आणि मी पण त्याला उत्तर दिले, असं नवीन म्हणाला.