breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

मणिपूरमधील ‘त्या’ घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले..

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ मे रोजी मणिपूरमधील थौबाला जिल्ह्यात ही घटना घडली आहे. संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझं मन दु:ख आणि रागाने भरलं आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणथ्याही सभ्य समजासाठी लज्जास्पद घटना आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे बाजूला ठेवा. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावलं आहे. १४० कोटी देशवासीयांना खाली पहावं लागत आहे.

हेही वाचा – पिंपळे सौदागरमधील नवीन रस्ता खचला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, त्यांनी आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावलं उचलावीत. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो, या देशात कोणत्याही भागात, कोणत्याही राज्यात राजकीय वादापलिकडे जाऊन कायदा सुव्यवस्था, महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मी देशवासीयांना विश्वास देऊ इच्छितो की, कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. कायदा आपल्या पूर्ण शक्तीनिशी आणि कठोरपणे पावले उचलेल. मणिपूरच्या मुलींबरोबर जे झालं ते कधीही माफ केलं जाऊ शकत नाही, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button