‘निवडणुकीत पराभवाच्या भीतीने कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द’; काँग्रेसची टीका
मुंबई : राज्यातील कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नाना पटोले म्हणाले, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आली. पण ते करतानाही हे पाप मागच्या सरकारचे असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले.
हेही वाचा – कॉलेजच्या कार्यक्रमात विद्यार्थांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देताच संतापल्या शिक्षीका! व्हि्डीओ व्हायरल
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय काँग्रेस सरकार असताना तत्तालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. पण ही नोकर भरती सरकारच करत होते व त्यांना नंतर सेवेत कायम केले जात होते. सध्याची नोकरी भरती मात्र खाजगी कंपनीकडून केली जात होती. सर्वात महत्वाचे म्हणजे, २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यंत्री होते, मग त्यांनी काँग्रेस सरकारचा कंत्राटी नोकर भरतीचा जीआर त्याचवेळी रद्द का केला नाही? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला.