ताज्या घडामोडीमुंबई

हनुमान चालिसा आणि महाआरतीवरून मनसेच्या नेत्याने आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदीच्या भोंग्यांचा प्रश्न चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत मशिदीवरील भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसेचं पठण करण्याचे आदेश कार्यकर्त्यांनी दिले. तसंच शनिवारी स्वत: राज ठाकरे हेदेखील पुण्यातील खालकर मंदिरात महाआरतीला उपस्थित राहिले आणि यावेळी कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसेचं पठणही करण्यात आलं. दुसरीकडे युवासेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतही हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेनेसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांना टोला लगावला आहे.

‘संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते. सहजच आठवलं… त्याचा नास्तिकांनी आणि नवपुरोगाम्यांनी केलेल्या महाआरतीशी संबंध नाही,’ असं संदीप देशपां डे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरे आणि हिंदुत्त्वाचं राजकारण

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात झालेल्या भाषणातून आणि ठाण्यात झालेल्या सभेतूनही आगामी काळात मनसे हिंदुत्त्वाचं राजकारण करणार असल्याचे संकेत दिले आहेत. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने हिंदुत्त्वाची स्पेस काबीज करण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचं वारंवार दिसत आहे. राज यांनी मागील काही भाषणांमध्ये केवळ महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणं टाळलं आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मनसेकडून भाजपसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button