मुंबईत कोरोना लसीकरणाला ब्रेक; नागरिकांचा संताप
मुंबई – कोरोना लसीचा तुटवडा असल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अनेक कोविड लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. सकाळपासून ज्येष्ठांसह नगारिकांनी लसीकरण करुन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र लस संपल्याने लसीकरण मोहीम सध्या थांबविण्यात आली आहे.
मुंबईतील सर्वात मोठ्या जम्बो व्हॅक्सिनेशन सेंटरमध्ये केवळ 160 लसीचे डोस शिल्लक होते. आज बिकेसी लसीकरण केंद्रात 160 लोकांना आत सोडले तर बाकी लोक रांगेत बाहेर उभे होते. त्यांना स्टॉक शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनेक ज्येष्ठ नागरिकही बाहेर रांगेत ताटकळत होते. काहींनी संताप व्यक्त केल्यानंतर सूचना लावण्यात आली की, साठा शिल्लक नाही. त्यामुळे लोकांचा प्रचंड संताप झालेला पाहायला मिळाला.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आता मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्याचबरोबर आज लस नसल्याने बीकेसीसह मुलुंडमध्ये लसीसकरण बंद करण्यात आले आहे.