breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

संचारबंदी जाहीर केल्यानंतरही मुंबईकर वाहनचालक रस्त्यावर

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संचारबंदी जाहीर केल्यानंतरही मुंबईकर वाहनचालक मोठ्या संख्येनं रस्त्यावर असल्याचं चित्र दिसून येत आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनचालकांची गर्दी दिसून आली. पोलिसांकडून प्रत्येक  वाहनाची तपासणी केली जात आहे. वाहनचालकांना घराबाहेर पडण्याचं नेमकं कारण विचारलं जात आहे. पण एवढं काय महत्वाचं काम मुंबईकरांना आहे? की ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत हा प्रश्न उभा राहत आहे.

जमावबंदीच्या आदेशाला मुंबईकरांनी हरताळ फासल्याचे दृश्य दिसून येत आहेत. ठाण्यातून मुंबईला येणाऱ्या गाड्यांच्या चेकनाक्यावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मुलुंड चेकनाक्यावर या गाड्या पोलिसांनी अडवल्या. मात्र, यावेळी काही मुंबईकरांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. राज्यात जमावबंदीचे आदेश आहेत. या आदेशाचा भंग केल्यास वाहनं जप्त करण्यात येतील असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. अशीच परिस्थिती पुण्यात देखील आहे. तर नागरिकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button