breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
शिर्डी ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली, बैठकीत झाला ‘हा’ निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Shirdi.jpg)
मुंबई | साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या वादाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत शिर्डीतील ग्रामस्थांचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिर्डी साई संस्थानचे प्रतिनिधी, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं, “आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेत आमच्या शिर्डीकरांच्या मनाचं समाधान झालं आहे त्यामुळे आम्ही शिर्डी बंद मागे घेत आहोत.”