पालघर आणि नाशिकमध्ये आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/EhcbJCoWsAAb4FG.jpg)
महाराष्ट्र सध्या एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे मात्र भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीने महाराष्ट्राच्या काही भागात नागरिक धास्तावले आहे. नाशिक जिल्ह्याला सलग दोन दिवस तर पालघरला 48 तासांच्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये सलग 5-6 भूकंपाचे धक्के जाणवले असल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे. दरम्यान पालघर मध्ये आज सकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी सुमारे 3.2 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. तर नाशिकमध्येही त्याच वेळेस पश्चिम दिशेच्या बाजूने 93 किमी दूर सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Capture-21.jpg)
पालघर, तलासरी, डहाणू हे भूकंप प्रवण आहे. मुंबई शहरापासून अवघ्या 100 किमीवर असणार्या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात. मागील 1-2 दिवसांत जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जीवीतहानी झाल्याचं वृत्त नसले तरीही घराला तडे गेल्याच्या घटना समोर आले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/EhcbIVxXkAEP7rd.jpg)
नाशिक मध्येही काल सलग दोनदा आणि आज सकाळी पुन्हा 3.2 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. दरम्यान वारंवार भूकंप जाणवत असल्याने नागरिकांमध्ये मात्र चागंलीच घबराहट निर्माण झाली आहे.