आंतरराष्ट्रीय संस्थेचा धक्कादायक खुलासा; भारतात एवढ्या लोकांना कोरोना
मुंबई | कोरोना व्हायरस जगात धुमाकूळ घालत असताना एका आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. या संस्थेने म्हटलं की, कोरोनाने आता तर फक्त भारतात पाय ठेवला आहे. जेव्हा हा वाढेल तेव्हा देशातील ४० कोटी नागरिकांना याची लागण होईल.
पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये स्थित सेंटर फॉर डिसीज डायनामिक्स, इकॉनॉमी अँड पॉलिसी (सीडीडीईपी) यांनी आपल्या ताज्या अहवालात खुलासा केला आहे की लॉकडाऊन हा एकमेव प्रतिबंधक उपाय भारतात होऊ शकत नाही. जर लोकं एकमेकांना भेटणं थांबवत नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सीडीडीईपीने असा दावा केला आहे की, अशी परिस्थिती उद्भवल्यास जुलै महिन्यात भारतातील 30-40 कोटी लोकांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. कोरोना विषाणूचा कोट्यवधी लोकांवर आक्रमण होईल, तर 20-40 लाख लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासेल.
सीडीडीईपीचे संचालक डॉ. रामानन लक्ष्मीनारायण यांनी एक हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, कोरोना विषाणूने नुकतेच भारतात पाय ठेवले आहे. लॉकडाउन बचावची नक्कीच एक पद्धत आहे. परंतु ही एक फूलीप्रूफ सिस्टम नाही. सध्या देशातील 10 लाख पैकी केवळ 15 जणांची कोरोनाची चाचणी घेण्यात येत आहे. देशातील बर्याच लोकांना संसर्ग होण्याचा धोका जाणवत आहे. सर्व नागरिकांना स्क्रीनिंगची सुविधा दिल्यानंतरच कोरोना विषाणूची नेमकी संख्या कळू शकते.