MPSC ची परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची मागणी, 96 हजार विद्यार्थी चिंतेत
पुणे |महाईन्यूज|
राज्यसेवा आयोगा मार्फत तीन वर्षातून एकदा RTOची परीक्षा घेतली जाते. RTOची ही परीक्षा येत्या 15 मार्च रोजी घेतली जाणार आहे. मात्र झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. एकट्या पुण्यात या परीक्षेसाठी 40 हजार विद्यार्थी बसणार आहे. त्याचबरोबर राज्यात 96 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात आल्यास गर्दी होऊ शकते. त्यांना संसर्ग झाल्यास हे लोण शहरातही पसरू शकते.
किंवा ही परीक्षा देण्यासाठी पुण्यात आलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला नकळत कोरोनाचा संसर्ग झाला आणि तो गावाकडे तसाच परत गेला तर मोठी अडचण होऊ शकते, शिवाय अशा परिस्थितीत ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर मोठा मानसिक तणाव निर्माण झालाय. राज्य सेवा आयोगाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परिक्षार्थी विद्यार्थ्यानी केली आहे.
कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअप व्हायरल झालेल्या अफवा याला कारणीभूत असल्याची आरोप केला जातोय. चिकन आणि अंडी खाल्यामुळे कोरोनाची लागण होते, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरल्यामुळे त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायीकांवर झालाय अहमदनगर जिल्हात एका महिन्यात 600 कोटींचा फटका बसला आहे.