राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा
![The intensity of rain will increase in next 48 hours in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Maharashtra-Rain-1-780x470.jpg)
पुणे : राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे मुंबईसह उपनगरात आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी, तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – भारतीय संघातून स्थान गमावण्यावर अखेर युजवेंद्र चहलने सोडलं मौन; म्हणाला..
दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधील विविध भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे.