Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महायुतीच्या मंत्र्यांचे टेन्शन वाढलं, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra Government : महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस) मंत्र्यांचे ‘टेन्शन’ वाढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कोणताही तात्काळ बदल होणार नसला तरी, सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे (परफॉर्मन्स ऑडिट) तपासणूक सुरू होणार आहे. ही प्रक्रिया आधीच सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर मंत्री बदलण्याच्या गुजरात पद्धतीप्रमाणे महाराष्ट्रातही असा फॉर्म्युला लागू होईल का, यावर चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी ऑडिटचा मार्ग निवडला आहे. यामुळे मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतःच्या मतदारसंघासह पालकमंत्री जिल्ह्यात ताकद दाखवावी लागेल, अन्यथा मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता शक्य आहे.

हेही वाचा –  ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा बनला लेफ्टनंट कर्नल ; संरक्षणमंत्र्यांनी केली पदवी प्रदान

फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्पष्ट केले की, “आम्ही सर्व मंत्र्यांच्या परफॉर्मन्सचे ऑडिट करणार आहोत. जर ऑडिटमध्ये आढळले की मंत्री योग्य काम करत नाहीत, तर त्यांच्या नावावर पुनर्विचार होईल.” हा निर्णय महायुती सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला असून, विवादास्पद मंत्र्यांना धक्का देण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.

गेल्या काही महिन्यांत एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला होता, ज्यामुळे मंत्रिमंडळातील बदलाच्या चर्चांना उधाण आले होते. आता ऑडिटद्वारे कामगिरीवर आधारित मूल्यमापन होईल, ज्यामुळे तुर्तास दिलासा मिळाला असला तरी मंत्र्यांवर दबाव कायम राहणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button