breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

काहींचा संविधानाला विरोधः प्रा. सुभाष वारे

  • संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला एस एम जोशी सभागृहात संविधान युवा परिषद उत्साहात

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

संविधान अंमलात येण्याआधी सर्वाना मताचा, शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुठभर लोकांकडे सर्व अधिकार एकवटले होते. मात्र संविधान अंमलात आल्याने सर्वाना एका रांगेत बसविले. त्यामुळे विशेषाधिकार गेल्याने काहींचा संविधानाला आजही विरोध आहे, असे प्रतिपादन संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांनी केले आहे.

संविधान दिनानिमित्त संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला एस एम जोशी सभागृह येथे ‘संविधान युवा परिषद’ झाली. या परिषदेचे आयोजन प्रा. मधु दंडवते वाचनालय व अभ्यासिका, महाराष्ट्र अंनिस शिवाजीनगर पुणे शाखा, छात्रभारती विद्यार्थी संघटना व अभ्यासिका विद्यार्थी समिती यांनी केले होते. अध्यक्षीय भाषण प्रा. सुभाष वारे यांनी केले. यावेळी एस एम जोशी सोशलिस्ट फौंडेशनचे विश्वस्त सचिव सुभाष लोमटे उपस्थित होते. “वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण, रोजगार, नोकरी, स्पर्धापरीक्षा आणि भारतीय संविधान” या अनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्यपदाधिकारी विशाल विमल, छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्या संपदा डेंगळे, अभ्यासिका विद्यार्थी समितीचे कार्यकर्ते अक्षय राऊत, प्रा. मधु दंडवते वाचनालय व अभ्यासिकेचे शेखर सोनार यांनी मांडणी केली.

प्रा. वारे असे म्हणाले की, ‘संविधानातील मूल्यांच्या बाजूने सामान्य जनतेचा सदसदविवेक जागृत राहीन, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अद्यापही राज्यकर्ते आणि नागरिकांनी संविधानाला जागृतपणे घेतलेले नाही. संविधानाकडे आपण तोकड्या नजरेने पाहत आहोत. संविधानात सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे.’ पंच्याहत्तर वर्षे होत आलेल्या संविधानाच्या जागराची आजही गरज पडत आहे, असे सांगत लोमटे यांनी समता, स्वातंत्र्य, लोकशाही हि मुल्ये कुटुंबात पाळली जातात का ? असा सवाल उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button