पाकिस्तानचे मोठे नुकसान ! भारताचे सगळे लष्करी तळ, युद्धसामग्री सुस्थितीत

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. तसेच भारताचे सर्व हवाई तळ सुरक्षित आहेत. एस-४०० पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती रघु आर नायर यांनी दिली.
तसेच समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यासाठी एक करार झाला आहे. भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाला या कराराचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारताने हा करार पूर्ण जबाबदारीने अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु कोणत्याही चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला इशाराही दिला.
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, गेल्या १२ तासांत पाकिस्तानचे खूप नुकसान झाले आहे. भारतीय सैन्याने लष्करी पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
पाकिस्तानने अनेक स्तरावर खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. भारताने कोणत्याही मशिदीला लक्ष्य केले नाही. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.
विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, पाकिस्तानकडून ब्राह्मोस तळाचे नुकसान झाल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. आम्ही पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था नष्ट केली आहे.
भारतीय सैन्य सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे. आम्ही कोणत्याही धार्मिक स्थळाचे नुकसान केलेले नाही. पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांचे नुकसान झाले आहे.