breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत गारठा, हवामान विभागाने दिला इशारा
पुणे | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात गारवा पसरलेला आहे. पुढील आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे.
१ फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळं उत्तर भारतात गारठा वाढला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर तापमानात वाढ होऊन थंडीचा प्रभाव कमी होईल.