भारतात हाय अलर्ट जारी ! ‘ही’ 24 एअरपोर्ट बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सूरू आहेत. या हल्ल्याला भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहेत.त्यात आता भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव पाहता देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.सुरक्षेच्या कारणास्तव भारतातील 24 एअरपोर्ट बंद करण्यात आली आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेनंतर भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईने संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते.त्यानंतर आज भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्सच्या अड्यावर हल्ला केला होता.त्यानंतर मध्यरात्री पाकिस्तानकडून भारताच्या अनेक भागात हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांना भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
हेही वाचा – भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान सीमेच्या नजीक काही एअरपोर्ट 10 मे पर्यंत बंद कऱण्यात आले होते. मात्र वाढता तणाव पाहता आता 24 एअरपोर्टस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही’ 24 एअरपोर्ट बंद
चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पटियाला, शिमला, गग्गल, भटिंडा, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, हलवारा, पठाणकोट, लेह, जम्मू, मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कांडला, केशोद, भुज, धर्मशाळा, ग्वालियर, गाजियाबाद