मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
![Chance of rain in Madhya Maharashtra, Konkan, Vidarbha, Marathwada](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Maharashtra-Rain-8-780x470.jpg)
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आणखी तीन दिवस पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे. तर राज्यातील अनेक भागांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २७ आणि २८ सप्टेंबरला महाराष्ट्र, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांत देशातील उर्वरित भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘भारत, इंडिया, हिंदुस्तान काय जातंय ३ नावं घ्यायला?’; राज ठाकरेंचं वक्तव्य
विदर्भातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.