breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सामना’चं संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडलं, संजय राऊतांकडे जबाबदारी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राचं संपादकपद सोडलं आहे. ‘सामना’ची संपूर्ण जबाबदारी आता खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संजय राऊतच आता सामनाचे कार्यकारी संपादक असतील. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी उद्धव ठाकरे ‘सामना’च्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत.

‘सामना’ हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम चर्चेत असतं. म्हणजेच देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमंसुद्धा एखाद्या मुद्द्यावर ‘सामना’च्या अग्रलेखात काय लिहिलंय यावर लक्ष ठेवून असतात. ‘सामना’त छापलेली बातमी किंवा अग्रलेख इतरांसाठी ‘बातमी’चा विषय असतो. शिवसेना सत्तेत असो किंवा बाहेर, या पक्षाची भूमिका नक्की काय आहे हे पाहण्यासाठी ‘सामना’कडे कायम लक्ष असतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button