संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील
मुंबई | महाईन्यूज
राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपा आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आता तरी शांत बसावं, राऊतांच्या तोंडी खंजीर खुपसल्याची भाषा शोभत नाही असं म्हणत चंद्रकात पाटलांनी राऊतांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. ’24 ऑक्टोबरला निकाल लागले. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर अडून राहिली. एकदाही बसून अडीच वर्षावर चर्चा झाली नाही. सातत्याने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भेटत राहीली पण भाजपाला भेटायला वेळ नव्हता. संजय राऊत तुम्ही शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावलीत. आता तरी शांत बसा’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Chandrakant Patil, Maharashtra BJP President: Sanjay Raut should now at least keep silent. He has ruined Shiv Sena.
3,1329:59 AM – Nov 23, 2019