breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझे नाव संघाशी जोडण्या-यांवर खटले दाखल करणार : अण्णा हजारे

अहमदनगर : सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाचे नुकसान होणार असेल तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी माझी धारणा आहे. खटाशी खट, धटाशी धट व उद्धटाशी उद्धट झालेच पाहिजे, अशा संत पंक्तींचा हवाला देत समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय संघाशी जाणीवपूर्वक आपले नाव जोडून बदनामीचा प्रयत्न सध्या माध्यमांमधून सुरू आहे. अशी बदनामी करणा-यांविरूद्ध न्यायालयात बदनामीचे खटले दाखल करणार असल्याचा इशारा गुरूवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.

यात अण्णा म्हणतात, दिल्ली येथील आंदोलनात सहभागी कल्पना इनामदार या नथूराम गोडसे यांची नात असल्याच्या व त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सूत्रे अण्णांनी सोपविल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक त्यांचा व माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलनासाठी विविध राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाची कोणतीही सूत्रे सोपविलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी आंदोलनाची कामे विभागून घेतली. त्यानुसार इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती. आंदोलनाची सर्व सूत्रे मी स्वत: हाताळीत होतो. इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याचे सुद्धा बदनामी करणा-या चौकडीला भानच राहिलेले नाही.

विशिष्ट वर्गाकडून माझे नाव संघाशी जोडण्याचा प्रयत्न करून काही मंडळी मला व आंदोलनास जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे रॅकेट चालवित आहेत. गेली २५ वर्षे राष्ट्रहितासाठी कोणत्याही पक्षाचा, व्यक्तीचा विचार न करता मी आंदोलने करीत आलो. आमच्या आंदोलनामुळे विविध पक्षांच्या मंत्र्यांना घरी जावे लागले. त्यामुळे त्या त्या पक्षांची मोठा हानी झाली. पण स्वत: भ्रष्ट असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत. आंदोलनामुळे राजकीय पक्षांची ‘धरले तर चावते अन् सोडले तर पळते’ अशी अवस्था झाली आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button