Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भारिप बहुजन महासंघ लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीत विलीन होणार – प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/prakash_0.jpeg)
अकोला – लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याचा निर्णय भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला आहे. तसेच लोकसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचा निर्धारही आंबेडकरांनी बोलून दाखवला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, भारिप बहुजन महासंघ या नावाशी माझं भावनिक नातं असलं तरी पुढची वाटचाल ही वंचित बहुजन आघाडी म्हणूनच होणार आहे. देशात दबावतंत्र आणि ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू आहे.
भाजपची इतर पक्षांवर ब्लॅक मेलिंग
स्मृती इराणी यांनी गांधी परिवारावर जमीन घोटाळ्यात केलेले आरोप हे दबाव आणि ब्लॅक मेलिंगचा प्रकार आहे. तुम्हाला घोटाळ्यांची माहिती होती. तर, कारवाई का केली नाही, असा प्रश्नही आंबेडकर यांनी भाजपाला विचारला आहे.