Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पेपर अवघड गेल्याने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/4-10.jpg)
बीड |महाईन्यूज|
बारावीचे पेपर अवघड गेल्यामुळे अंबाजोगाई शहरातील बारावीतील विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. संचिता चंद्रकांत नरारे (१७, रा. ममदापूर पाटोदा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, संचिता चंद्रकांत नरारे व तिची आई आणि बहीण हाउसिंग सोसायटीमध्ये भाड्याने राहत होते. मृत संचिता ही बारावीचे सर्व पेपर अवघड गेल्याने ती दुःखी होती. रविवारी सकाळी आई व बहीण बाहेर गेले असता संचिताने बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत. संचिताच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे