देशात 24 तासात 48 हजार 661 जणांना कोरोनाचा संसर्ग, तर 705 जणांचा मृत्यू
![The total number of corona infections in India is 1,11,92,088 with 18,327 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-4.jpg)
नवी दिल्ली – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत 48 हजार 661 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, एकूण 705 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट 63.9% झाला आहे.
शनिवारी देशात सर्वात जास्त कोरोना चाचण्यात केल्या. एकाच दिवसात 4.42 लाख चाचण्या झाल्या. यासह देशात एकूण 1 कोटी 63 लाख लोकांची चाचणी झाली. गेल्या 30 दिवसात सगळ्यात जास्त कोरोना चाचण्या केल्या. तर, जगभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या यादीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात 24 तासांत उच्चांकी 9 हजार 251 रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या 8 ते 10 हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर, 257 एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 66 हजार 368 एवढी झाली आहे. तर 13 हजार 389 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत 1080 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या 108060 एवढी झाली आहे. तर आज 7 हजार 227 जणांना रुग्णालयातून घरी पाठविले आहे.