breaking-newsमहाराष्ट्र
दहावी आणि बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा, बोर्डाचं स्पष्टीकरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/SSC-board_-HSC-board-students_-class-x.jpg)
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन 4 लागू करण्यात आला आहे. आधी राज्य सरकारने मग केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. या काळात अनेक परीक्षा रद्द झाल्या, तर ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे.
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केलं आहे.