breaking-newsमहाराष्ट्र
तिवरे धरण दुर्घटना ; आतापर्यंत २० मृतदेह हाती
रत्नागिरीतील तिवरे धरणफुटीतील मृतांचा आकडा आता २० वर पोहोचला आहे. एनडीआरएफच्या जवानांकडून सलग पाचव्या दिवशी शोधमोहीम राबवली जाता आहे. अद्याप तीन जण बेपत्ता आहेत.
या अगोदर आज सकाळी शोधमोहीमेस सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच एक मृतदेह हाती लागला होती. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १९ झाला होता. मात्र नंतर दुपारी आणखी एक मृतदेल आढळून आल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होऊन तो २० झाला आहे.
तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटल्यानंतर २२ ग्रामस्थ बेपत्ता झाले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यातील १३ जणांचे मृतदेह सापडले. त्यांच्यावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी आणखी पाच मृतदेह सापडले. त्यापैकी चौघांची ओळख पटली होती.