breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कडकनाथ प्रकरणातून मला राजकारणातून संपवण्याचे षड्यंत्र- सदाभाऊ खोत

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|

आमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती, कडकनाथ कोंबडी संस्थेशी संबंधित नाही, त्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही. मला राजकारणातून संपवण्याच्या उद्देशाने आंदोलन करत आहेत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे ते बोलत होते.

कडकनाथ घोटाळ्यावरून आरोप होत असल्याने माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानाचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर आज टीकेची झोड उठवली. त्यावर खोत म्हणाले की, काही स्वकीय आणि परकीय हितचिंतक हे सातत्याने मैदानात लढण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गाने मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिखर बँक प्रकरणात आणि साखर कारखाने विक्री प्रकरणात राजू शेट्टी हे मॅनेज झाले, शेट्टी हे अनेकवेळा दिशाभूल करून अनेक वेळा सेटलमेंट केल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अन्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. यामध्ये रयत ऍग्रो कंपनीने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात रयत ऍग्रो कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button