breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Lockdown: गरीबांच्या खात्यात तातडीने ७५०० रुपये ट्रान्सफर करण्याची वेळ: राहुल गांधी
गरीबांच्या खात्यात तातडीने ७५०० रुपये जमा करावेत अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सरकारने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यासाठी ६५ हजार कोटींची गरज आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लॉकडाउन उठवण्यासाठी मोदी सरकारने आता योग्य नियोजन करावं असंही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.स्थलांतरित मजुरांसाठी वेगळी उपाय योजना करा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. या सगळ्यांना आज मदत करण्याची गरज आहे. आपली अर्थव्यवस्था ढासळत आहे. अशावेळी गरीबांना, मजुरांना, लघु आणि मध्यम उद्योजकांना आज मदत करायला हवी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.