“काय झाले युद्धबंदीचे? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत”, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले ट्विट

श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शनिवारी (१० मे) संध्याकाळी ५ वाजेपासून दोन्ही देशांनी जमीन, हवा आणि समुद्रातील सर्व सैन्य कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवली होती. मात्र, रात्री श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने तणाव पुन्हा वाढला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत ‘एक्स’वर लिहिले, “शस्त्रसंधीचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचा आवाज ऐकू येतोय!!!”
हेही वाचा – ‘आळंदीत आंतरराष्ट्रीय ज्ञानपीठ उभारणार’;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– बारमेरमध्ये एकामागोमाग ड्रोन दिसल्याचे सांगितले जात आहे.
– कच्छमध्ये पाकिस्तानचे 10 ड्रोन दिसले.
– नौशेरामध्ये ड्रोन दिसल्याची माहिती.
-संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज आले.
– पाकिस्तानने अवघ्या 3 तासांत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
– भारताने श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडल्याची माहिती.





